वाटायचे मज ब-याचदा
सांगावे तूज सर्व काही
शब्द ओठी जमू लागलेच होते
पण त्या शब्दास आता अर्थ नाही
..................................................
तू नसताना मज सोबती
कसे फुटावे शब्दांना धुमारे
वाटते की सावलीच हरवली
मग शब्दतरी कशी साथ देतिल बिचारे
................................................
ती रात होती केवड्याची
अजूनी मला ते स्मरते आहे
तु लाजलेली तशीच समोर
काळ्या मेघांनी हे आभाळ पुन्हा भरतं आहे
........................................

-- आनंद काळे

No comments: